Pankaj Tripathi Main Atal Hoon movie Interview : प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मैं अटल हू या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरु आहे. त्यामध्ये प्रख्यात अभिनेता पंकज त्रिपाठीनं देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आता सध्या त्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु झाले आहे. पंकज त्रिपाठीनं दिलेल्या मुलाखतीची चर्चा सुरु झाली आहे.
मैं अटल हू च्या निमित्तानं पंकज पहिल्यांदा बायोपिकमध्ये झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची चाहत्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सगळ्यात पंकजनं एका मुलाखतीमध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगताना नजीकच्या काळात आपण एका निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून अव्याहतपणे आपण बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. अशा परिस्थितीत थोडी फार विश्रांती हवी असे मला वाटते. वैयक्तिक आय़ुष्यातील अनेक गोष्टींवर आता मी लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. अशा शब्दांत पंकजनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता पंकज काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक तर घेणार नाही ना, अशी शंका चाहत्यांच्या मनात डोकावू लागली आहे.
त्या मुलाखतीमध्ये पंकजनं म्हटले आहे की, आपण साधारण आठ तास झोपतो. त्यानंतर कुठे आपले शरीर सोळा तास काम करण्यासाठी तयार होते. इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर मला कधीही तितके तास विश्रांती घेण्याची संधी मिळालेली नाही. अशावेळी आता मला आठ तास शांत झोपेची गरज आहे. त्याचे महत्व काय आहे हे मला कळून चुकले आहे. त्यामुळे येत्या काळात माझ्या विश्रांतीच्या आड ज्या गोष्टी येतील त्यांचा त्याग मी करणार आहे. असे पंकजनं म्हटले आहे.
एक व्यक्ती म्हणून मी नेहमीच गांभीर्यानं विचार करणारा आहे. जे मी ठरवतो ते करण्यावर माझा पूर्णपणे भर असतो. त्यामुळे आता जो मी विश्रांतीच्या बाबत विचार केला आहे त्याच्यावर ठाम राहण्याचा विचार करणार आहे. असेही पंकजनं त्या मुलाखतीतून सांगितले आहे. यापूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्रानं पंकजचा एक व्हिडिओ शेयर केला होता त्यात त्यानं आपल्या सध्याच्या धावपळीच्या आयुष्यावर भाष्य केले होते.
मैं अटल हू विषयी बोलायचे झाल्यास येत्या १९ जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता रवी जाधव यांनी केले असून त्याचे लेखन ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.