
आशिकी (Aashiqui) सिनेमानंतर बॉलीवूडमध्ये आपलं नाव सर्वपरिचित करणाऱ्या राहुल रॉयचा (Rahul Roy) आज ५४ वा वाढदिवस आहे. राहुल रॉयचं फिल्मी करिअर म्हणजे एखाद्या रोलर-कोस्टर राइडसारखंच आहे. आशिकी या आपल्या पहिल्या सिनेमामुळे राहुल रॉय रातोरात स्टार झाला. पण एक वेळ अशीही त्याच्यावर आली होती की त्याला कोणताही बडा निर्माता-दिग्दर्शक फिल्म ऑफर करीत नव्हता. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॉलीवूडमधून अचानक त्याच्या गायब होण्याचं कारण समोर आलं आहे. चला जाणून घेऊया राहुल रॉयचं यश-अपयश यासंदर्भात थोडक्यात. राहुल रॉय यांची आई एका फॅशन मॅगझीनसाठी लिहायची तर वडिल बिझनेसमन म्हणून काम करायचे. एकदा इंदिरा रॉय यांनी लिहिलेला एक लेख महेश भट यांना इतका आवडला की त्यांनी थेट त्यांची भेट घ्यायचं ठरवलं. त्यावेळी राहुल रॉयचं फॅशन इंडस्ट्रीत मॉडेल म्हणून नाव कमावण्यासाठी स्ट्रगल सुरू होतं.
त्या मीटिंगच्या दरम्यान राहुल रॉयच्या आईने त्याचे काही फोटो महेश भट्ट यांना दाखवल्यानंतर ते खूप खूश झाले. आणि त्यांनी लगेच आपल्या पुढील सिनेमात राहुलला हिरो म्हणून घ्यायचं ठरवलं. तोच 'आशिकी' सिनेमा जो पुढे सुपरहीट ठरला आणि त्यानं बॉक्सऑफिसचे सगळे रेकॉर्ड त्यावेळचे तोडले. तब्बल ६ महिने 'आशिकी' सिनेमा हाऊसफुल चालला. पण या सिनेमानंतर राहुलकडे मात्र एकही चांगल्या सिनेमाची ऑफर आली नाही. तो वाट पाहत राहिला. आणि त्यानंतर अशी वेळ आली की एकाच वेळेला त्याच्याकडे तब्बल ६० सिनेमे चालून आले होते. सगळ्याच सिनेमांची शूटिंग वेळेत पूर्ण होण्यासाठी राहुल एका दिवसात तीन-तीन सिनेमांचं शूट करायचा. पण वेळेचं गणित मॅनेज करू शकत नसल्याने राहुलने जवळ-जवळ २१ निर्मात्यांचे पैसे परत केले. आणि त्या सिनेमांना रामराम केला.
त्या सिनेमानंतर राहुलचे एकापाठोपाठ एक अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. ज्यामध्ये 'फिर तेरी याद आई','जानम','सपने साजन के','गुमराहं','मझदार' अशा सिनेमांचा समावेश आहे. यामध्ये ३ सिनेमे पूजा भट्टसोबत,२ शिल्पा शेट्टीसोबत तर २ करिश्मा कपूर सोबत,१ श्रीदेवीसोबत आणि २ रविना टंडनसोबत... पण यामधील एकही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. राहूलने अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शनातही आपलं नशीब आजमावलं. त्यानं भोजपूरी सिनेमांचही दिग्दर्शन केलं आहे. पण तिथेही त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर २००६ मध्ये राहूल 'बिग बॉस' मध्येही सहभागी झाला होता. तेव्हा राहुलला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली अन् त्यानं त्यावेळची बिग बॉस ट्रॉफी आपल्या नावावर केली. पण त्यानंतरही तो बॉलीवूडमध्ये मात्र पुन्हा प्रवेश करू शकला नाही. २०१७ मध्ये त्यानं भाजपात प्रवेश करीत राजकारणाचा मार्ग स्विकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.