सलमानच्या समन्सवर राखीची सुनावणी

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सलमानला अंधेरी कोर्टानं समन्स बजावलं असून ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
salman khan and rakhi sawant
salman khan and rakhi sawantgoogle

दोन वर्षांपूर्वी सलमान सायकल राईड करीत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी सलमानचे(Salman Khan) चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. हे सलमानला आवडले नसल्याने त्याने गैरवर्तन केल्याची तक्रार पत्रकाराने केली होती. पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलमान आणि त्याच्या ड्रायव्हरने कथित मारहाण केली होती. त्याला काळवीट शिकार प्रकरणात नुकताच दिलासा मिळाला असला तरी पत्रकाराशी गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमानला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या संदर्भात ५ एप्रिल राेजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

salman khan and rakhi sawant
वयाच्या ७४ व्या वर्षी 'लगान' सिनेमातील मुखिया राजेंद्र गुप्ता झालेयत हताश

दोन वर्षांपूर्वी सलमान सायकल राईड करीत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी सलमानचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. हे सलमानला आवडले नसल्याने त्याने गैरवर्तन केल्याची तक्रार पत्रकाराने केली होती. पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलमान आणि त्याच्या ड्रायव्हरने कथित मारहाण केली होती. त्यामुळे काळवीट प्रकरणात नुकताच दिलासा मिळाला असला तरी पत्रकाराशी गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमानला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या संदर्भात ५ एप्रिल राेजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.असे असले तरी राखी सावंत हिने मात्र सलमान खानची बाजू समजून घेण्याचे निवेदन केले आहे. सलमान खान विषयी तिला असलेल्या कौतुक आणि आदराबद्दल सगळ्यांना ठाऊकच आहे. त्यामुळे यंदाही भाईजानची पाठराखण करण्यासाठी राखी पुढे सरसावली आहे.

salman khan and rakhi sawant
मुस्लिम धर्माविरोधात थिएटरात घोषणा; प्रकाश राजना खटकला The Kashmir Files

सलमान खान समन्स विषयी राखी सावंत (rakhi sawant) ला विचारले असता तिने हे विधान केले आहे. राखी म्हणते, 'कोणताही मीडिया कधीच वाईट नसतो, परंतु जेव्हा तुम्ही मोठे स्टार होता तेव्हा काही प्रश्न तुम्हाला त्रास देतात. सलमानचे सिनेमे सुपरहिट आहेत, त्याचे लाखो चाहते आहेत पण कुठेतरी त्याला जीवनाचा आनंद मिळाला नाही. मला वाटते की त्याला सर्व काही मिळाले आहे, परंतु त्याने बरेच काही गमावलेही. जर तुम्ही एखाद्याची दुखरी नस दाबली तर त्याचे चिडणे स्वाभाविक आहे. तोही माणूस आहे. तुम्हाला माहीत नाही पण सलमान नेहमीच तणावात असतो. जेव्हा त्याचे सिनेमे रिलीज होतात तेव्हा त्याला चाहत्यांसमोर येण्याची इच्छा नसते. जर कोणी चुकीचा प्रश्न विचारला तर त्याला राग येऊ शकतो, तो सच्चा माणूस आहे म्हणून त्याने जर काही बोलले असेल तर लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे मला वाटत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com