Ranbir Kapoor ने अर्ध्यावरच सोडून दिलेला 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा.. मात्र याच सिनेमानं फळफळलं होतं हृतिकचं नशीब

रणबीर कपूरनं सिनेमा सोडल्यानंतर त्याचे दिवंगत वडील ऋषि कपूर त्याच्यावर भलतेच बिघडलेले.. हा किस्सा स्वतः अभिनेत्यानं शेअर केला होता.
Ranbir Kapoor, Hrithik Roshan
Ranbir Kapoor, Hrithik RoshanEsakal

Ranbir Kapoor: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष आता झाली आहेत. इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. रणबीर कपूरनं अनेक सिनेमे केले ज्यांनी बॉक्सऑफिसवर मोठे रेकॉर्ड्सही केले पण तुम्हाला माहित आहे का असा एक सिनेमा होता ज्याला रणबीरनं अर्ध्यातच सोडलं होतं आणि पुढे जाऊन तो सिनेमा सुपरहिट ठरला होता.

आजही या सिनेमाच्या चर्चा रंगताना दिसतात आणि लोक याला पाहणं पसंत करतात. रणबीरनं त्याच्या त्या अर्ध्यातनंच सोडलेल्या सिनेमाचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता आणि त्या मुलाखतीत हे देखील कळलं होतं की तो सिनेमा सोडल्यावर त्याचे वडील अभिनेते ऋषि कपूर त्याच्यावर भडकले होते.

चला जाणून घेऊया की रणबीर नेमका कोणत्या सिनेमातून वॉक आऊट झाला होता आणि त्यानं या संदर्भात कधी खुलासा केला होता.(Rishi Kapoor Angry with ranbir kapoor actor walked out the blockbuster movie and hrithik entered in movie)

Ranbir Kapoor, Hrithik Roshan
Palak Tiwari: बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा..

तुमच्या माहितीसाठी इथे सांगतो की रणबीर कपूर 'बॉम्बे वेल्वेट' च्या एका प्रमोशनल मुलाखती दरम्यान गेम खेळत होता ज्यामध्ये त्याला विचारलं गेलं की,'त्यानं कधी कोणता सिनेमा मधनंच सोडला आहे का? तो कधी कोणत्या सिनेमातून वॉक आऊट झाला आहे का?'

त्यावर रणबीरनं पहिलं तर सांगितलं की हो त्यानं असं केलं होतं. पुढे त्याला यावर विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला की, ज्या सिनेमातून त्यानं वॉक आऊट केलं होतं ,त्या सिनेमाचं नाव 'जोधा अकबर' होतं.

Ranbir Kapoor, Hrithik Roshan
Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'

याच मुलाखतीत त्यानं 'जोधा -अकबर' सिनेमाचं नाव घेत म्हटलं होतं की तो या सिनेमाला अर्ध्यातनंच सोडून गेला होता. रणबीर म्हणाला की त्याच्या या निर्णयानं त्याचे वडील ऋषि कपूर खूप नाराज झाले होते. रणबीर कपूर म्हणाला की त्यानंतर त्यानं कधीच कोणत्या सिनेमाला अर्ध्यातनंच न सोडण्याचा निर्णय घेतला.

Ranbir Kapoor, Hrithik Roshan
Siddhu Moosevala हत्येप्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा खळबळजनक खुलासा.. हत्येआधी हत्यारांसाठी लावली होती अशी फिल्डिंग

'जोधा अकबर'मध्ये नंतर अभिनेता हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिका साकारताना दिसले होते. आशुतोष गोवारिकर यानं हा सिनेमा २००८ मध्ये रिलीज केला होता आणि या सिनेमासाठी त्याने तीन इंटरनॅशनल अॅवॉर्ड्स, दोन नॅशनल अॅवॉर्ड्स,पाच फिल्मफेअर अॅवॉर्ड्स,दहा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अॅवॉर्ड्स आणि सात स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्स जिंकले होते.

२००८ मध्ये सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा तो ठरला होता. बॉक्सऑफिसवर १०८ करोड रुपये या सिनेमानं कमावले होते. हा सिनेमा ४० करोडच्या बजेट मध्ये बनला होता.

Ranbir Kapoor, Hrithik Roshan
Mira Rajput: 'मला घरी जाऊ द्या..', पापाराझींना विनवणी करत भर कार्यक्रमातनं मीरानं घेतली घराकडे धाव..असं काय घडलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com