सतरा वर्षांपूर्वीच रितेश जेनेलियाला म्हणाला होता, 'तुझे मेरी कसम'!

Untitled-6.jpg
Untitled-6.jpg

मुंबई : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या पहिल्या चित्रपटाला म्हणजेच 'तुझे मेरी कसम'ला आज 17 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाच्या सेटपासूनच त्यांची लव्हस्टोरी बहरू लागली. रितेशचा हा बॅालिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्या मैत्रीला चांगली पालवी फुटली अणि काही काळानंतर हे प्रेम चांगलेच बहरून आले. त्यानंतर ते एकमेकांना 10 वर्षे डेट करत होते. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. आज त्यांना दोन मुले आहेत. 

दरम्यान, मस्ती, हाऊसफुल, ग्रँडमस्ती सारखे हिट चित्रपट देणारा रितेश देशमुख आपल्या खासगी जीवनात खूप यशस्वी आहे. रितेश आणि जेनेलिया पहिल्या वेळेस २००२ ला आपल्या पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ च्या शूटिंगदरम्यान भेटले होते. त्यांची भेट हैद्राबादच्या एअरपोर्टवर झाली होती. रितेशला अगोदरच सांगण्यात आलो होते कि त्याची हिरोईन त्याची वाट बघत असेल. परंतु जेव्हा तो एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा जेनेलियाचा स्वभाव पाहून तो हैराण झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#17YearsOfTujheMeriKasam

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

जेनेलियाला माहिती होते कि हा हिरो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तिला वाटले कि रितेशला खूप घमंड असेल. ह्याशिवाय तो भाव खाणार. जेनेलियाने स्वतःहून रितेशला हाक मारली नाही. रितेशने स्वतःहून पुढे होऊन जेनेलियाचा हाथ मिळवला. जेनेलिया हाथ मिळवून त्याच्याकडे न पाहता इथे तिथे बघू लागली. रितेशला जेनेलियाचा पहिल्या भेटीत इतकं भाव खाणे आवडलं नाही. पण हळू हळू जेव्हा त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग चालू झाले तेव्हा जेनेलियाला जाणवलं कि रितेश मनाने खरंच खूप चांगला आहे. त्याच्यात जरा सुद्धा गर्व वगेैरे नाही आहे. तो पूर्ण टीम सोबत मिळून राहतो. दोघांमध्ये मैत्री वाढू लागली.

त्यादरम्यान सेटवर दोघेही खूप गप्पा मारत. २४ वर्षाचा रितेश आणि १६ वर्षाची जेनेलियाशी आर्किटेक्चर बद्दल गप्पा मारायचा आणि जेनेलिया त्याला आपल्या शिक्षणाबद्दल सांगत असे. त्या वेळी दोघांना काय माहिती होते कि एक दिवस हे दोघेही पती पत्नी बनणार ते. हैद्राबादमधील शूटिंग संपल्यानंतर जेव्हा रितेश घरी परत आला तेव्हा त्याला जेनेलियाची कमी जाणवू लागली. तो तिला खूप मिस करू लागला. पण त्याला वाटले कि एका मुलीला इतक्या लवकर फोन करणे ठीक राहणार नाही. तिथे जेनेलिया सुद्धा रितेशच्या बाजूने पूर्णतः आकर्षित झाली होती. असं नाही आहे कि दोघांना अचानकच एकमेकांसोबत प्रेम झाले. हा प्रवास खूप जास्त चालला.

दरम्यान, दोघांना एकमेकांच्या मैत्रीची सवय झाली होती. त्यांना कळलंच नाही कि, केव्हा त्यांना एकमेकांसोबत प्रेम झाले ते. ह्यानंतर दोघांनी ‘मस्ती’ चित्रपटातसुद्धा काम केले. ह्या दोघांच्या नात्याला पहिल्या चित्रपटापासूनच सुरुवात झाली होती. परंतु त्यांनी ह्या बातम्या मीडियामध्ये येऊ दिल्या नाहीत. त्यांच्या मते नात्याची सुंदरता हीच राहिली कि त्यांना एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी कधीच महागड्या कँडललाईट डिनर किंवा गिफ्ट्सची आवश्यकता पडली नाही. त्यांच्यासाठी एकमेकांचे प्रेमच सर्व काही होते. जे काही न बोलताच सर्व काही समजून गेले. शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले.

थक्क करणारी गोष्ट म्हणजे ते लग्नाच्या अगोदर एकमेकांना १० वर्ष डेट करत होते, परंतु मीडियामध्ये ह्यांच्या अफेअरच्या कोणत्याच बातम्या आल्या नाहीत. जेनेलिया आणि रितेशला रिआन आणि रिधान अशी दोन मुले आहेत. त्यांच्या या चित्रपटाला 17 वर्षे पुर्ण झाली आहेत. याचेच सेलिब्रेशन रितेश आणि जेनेलिया करत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com