सिनेनिर्मितीतून समाधान महत्त्वाचे - सुमित्रा भावे

सिनेनिर्मितीतून समाधान महत्त्वाचे -  सुमित्रा भावे

कोल्हापूर - ‘कुठलीही सिनेनिर्मिती ही त्या प्रक्रियेतील प्रत्येकाला समाधान देणारी असावी. त्याच्याही पलीकडे जाऊन ती सत्य, शिव आणि सुंदरतेशी नातं सांगणारी असावी,’ असे स्पष्ट मत  ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले. 

येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिठी’ हा सिनेमा दाखविला. त्यानंतर त्यांच्याशी चित्रपंढरीतील वारकऱ्यांनी मुक्तसंवाद साधला. दरम्यान, महोत्सवांतर्गत झालेल्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना उद्या (ता.१०) पारितोषिक वितरण होणार आहे. रिलायन्स मॉलमधील आयनॉक्‍स थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. 

सुमित्रा भावे म्हणाल्या,‘‘सिनेनिर्मितीत केवळ अभिनेता व अभिनेत्रींच्या नावांचीच फार चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेतील प्रत्येक घटक हा हाडाचा कलाकार असतो. मात्र, प्रत्येकाला त्यांचे अवकाश मुक्तपणे दिल्यासच सुंदर निर्मिती होत असते.’’

‘दिठी’ म्हणजे दृष्टी. हा सिनेमा साकारताना अनेक अडचणी आल्या. पण, तितकेच समाधानही वाटले. ‘अमृतानुभव’ वारंवार वाचले. त्याचा अभ्यास केला. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम ही संत मंडळी खऱ्या अर्थाने मानसशास्त्रज्ञ असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी स्वागत केले. धनंजय कुलकर्णी, योगिनी कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com