Urfi Javed Comment On Akshay Kumar Film : आपल्या बेताल वक्तव्यामुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. आता तिने अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) निशाणा साधला आहे. उर्फीने अक्षयचा चित्रपट रक्षाबंधनवर टीका केली आहे. रक्षाबंधन बाॅक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला आहे. एका मुलाखतीत रक्षाबंधनच्या पटकथेवर सवाल उपस्थित करत उर्फी जावेद (Urfi Javed) विचारते की हा चित्रपट बनवलाच का आहे?
उर्फी म्हणते, रक्षाबंधनचे ट्रेलर मी पाहिले. मला वाटले हा चित्रपट ३० वर्षानंतर का प्रदर्शित होत आहे. ती तर ९० व्या दशकात प्रदर्शित व्हायला हवा होता. हा हुंडा काय असतो. बहिणीचे लग्न करायचे आहे. हुंड्याची जमवाजमव करायचे आहे. मला माफ करा. पण हा चित्रपट ३० वर्षांपूर्वीचा आहे. (Bollywood News)
आज आपल्याला अशा चित्रपटाची गरज आहे जिथे मुलीने म्हणायला हवे, भावा ऐक तू तुझ काम कर, मी माझे काम करते. माझ्या लग्नाची चिंता करण्याची गरज नाही. मी आपले काम करेल, पैसा कमवेल, खाण-पिण करेल. रक्षाबंधनमधील त्या बहिणींना हे बोलायला हवे होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.