
मुंबई : यशराज फिल्म्सची स्थापना यश चोप्रा यांनी केली. यशराजचा पहिला चित्रपट 'दाग'. या चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत होते. परळ येथील राजकमल स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त दिलीप कुमार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर या बॅनरतर्फे अनेक चित्रपट निघाले. 'दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे' पासून यशराजचा कारभार अंधेरी येथून सुरू झाला. तेथे भव्यदिव्य असा स्टुडिओ बांधण्यात आला आणि आता तेथूनच अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे. कित्येक चित्रपटांचे चित्रीकरण, डबिंग आणि रेकॉर्डिंग होत आहे.
आजच्याघडीला आघाडीचे बॅनर्स म्हणून यशराज फिल्म्सकडे पाहिले जाते. 27 सप्टेंबर रोजी या बॅनर्सला पन्नास वर्षे होत आहेत. त्यानिमित्त 'वायआरएफ प्रोजेक्ट 50' या कार्यक्रमाची घोषणा आणि त्याचा आराखडा दिवंगत फिल्म मेकर यश चोप्रा यांच्या जयंतीदिनी जाहीर करण्यात येणार आहे. निर्माते व दिग्दर्शक आदित्य चोप्रा याबाबतची घोषणा करणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून ते पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '27 सप्टेंबर रोजी 'वायआरएफ'च्या 50 वर्षांच्या प्रवासाच्या वर्षभर चालणाऱ्या कौतुक सोहळ्याची सुरुवात होईल. ब्रँड वायआरएफच्या या सोहळ्यासाठी वर्षभरासाठी अत्यंत दर्जेदार कार्यक्रम आखण्यात आले आहेत आणि या दिवशी आदित्य चोप्रा स्वत: वायआरएफ प्रोजेक्ट 50 चा आराखडा समोर आणेल. आदि वायआरएफबद्दल काही तरी भव्य सांगेल, हे नक्की. आता 27 सप्टेंबर रोजी आदि काय घोषणा करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.'
----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.