आमदार शिरसाट, शहर संघटक खेडकरमधील वाद मिटवू : आमदार अंबादास दानवे

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट व शहर संघटक सुशिल खेडकर
औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट व शहर संघटक सुशिल खेडकर

औरंगाबाद - आमदार संजय शिरसाट आणि शहर संघटक सुशील खेडकर यांच्यातील वाद हा वैयक्तिक आहे. तो ठेकेदारीवरून झाला की अन्य कारणावरून हे सांगता येणार नाही. श्री. खेडकर यांना मारहाण झाली हे जरी खरे असले तरी ती आमदार श्री. शिरसाट यांनी केलेली नाही.

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजातुन एकमेकांवर हात उचलले असे स्पष्ट करतांनाच पक्ष म्हणून यात लक्ष घालून वाद मिटवू अशी भूमिका आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मांडली. 

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयासमोर शनीवारी (ता.18) शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण झाली होती. सातारा देवळाई भागातील रस्त्याच्या कामाचे टेंडर मागे घेण्यासाठी ही मारहाण करण्यात आल्याचा दावा श्री. खेडकर यांनी पोलीस जबाबात केला होता. तर विकासकामात खोडा आणल्यामुळे श्री. खेडकर यांची समजुत काढतांना त्यांनी अरेरावी केली आणि त्यातून समर्थकांकडून ही मारहाण झाल्याचे आमदार श्री. शिरसाट यांनी सांगून मारहाणीत आपला हात नसल्याचे यापुर्वीच स्पष्ट केले आहे.

शिवसेनेने या वादापासून स्वःताला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्यानिमित्ताने सोमवारी (ता.20) पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद शहरात आले होते, त्यांनी देखील या वादावर भाष्य करणे टाळले. या संदर्भात मंगळवारी (ता.21) पत्रकारांशी बोलतांना आमदार अंबादास दानवे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, आमदार संजय शिरसाट व शहर संघटक सुशिल खेडकर यांचा वाद झाला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. टेंडरवरून हा वाद झालेला नाही, शिवाय शिरसाट यांनी खेडकर यांना मारहाण देखील केलेली नाही. हा वाद वैयक्‍तिक स्वरुपाचा होता, या वादाचा शिवसेनेशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यात हा विषय देखील निघाला नाही.

आमदार श्री. शिरसाट व श्री. खेडकर यांचा हा वैयक्तिक वाद आहे. हे दोघे शिवसेनेचे जबाबदार लोकप्रतिनिधी, पदाधिकारी असल्यामुळे असा प्रकार घडणे योग्य नाही. वैयक्तिक वाद असला तरी शिवसेना पक्ष म्हणून यात लक्ष घालेल आणि तो मिटवला जाईल असेही आमदार श्री. दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हास्य कविसंमेलनाचे आयोजन 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.24) सायंकाळी 6 वाजता हास्य व वीररस कवी संमेलन घेण्यात येणार आहे. यामध्ये देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

यामध्ये पवन आगरी, डॉ. प्रतिक गुप्ता, पार्थ नवीन, मोहन मुंतजिर, खुशबू शर्मा सहभागी होणार आहेत. क्रांतीचौकातील हॉटेल मॅनोरच्या लॉन्सवर हा कार्यक्रम होणार आहे. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन सौरभ जैन सुमन करणार असल्याचे कविसंमेलनाचे संयोजक आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com