औरंगाबाद: देशावरील आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे. भाजप शहर कार्यकारिणीतर्फे शहरातील असंघटित कामगार, मजदूर, हॉकर्स व रोजंदारी कामगारांच्या मदतीसाठी हात पुढे करण्यात आला आहे.
भाजपतर्फे शहरात शंभर क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. १३) शहरातील नऊ मंडळांत वॉर्डा-वॉर्डांत हे धान्यवाटप करण्यात येत आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.
श्री. केणेकर म्हणाले, भाजपतर्फे शहरातील नऊ मंडळांत मंडळ अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून गरीब, गरजू अशा १५ हजार कुटुंबीयांना पाच किलो अन्नधान्याची बॅग वाटप करणार आहोत.
आज कलश मंगल कार्यालयात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, अनिल मकरिये, भगवान घडामोडे, कचरू घोडके, मनोज पांगारकर, रामेश्वर भादवे, एजाज देशमुख, अमृता पालोदकर यांच्या उपस्थितीत आज मंडळ अध्यक्षांकडे धान्य पोच करण्यात आले.
हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..
मंडळ अध्यक्ष हे वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून त्या-त्या वॉर्डात गरजू व कामगारांना धान्यवाटप करणार आहेत. यामुळे गरजूंना या काळात मोठा आधार मिळणार आहे.
भाजपतर्फे सदैव शहरवासीयांच्या पाठीशी व सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. त्याच माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. गरजू लोकांनी आपल्या वॉर्डातील अध्यक्ष तसेच मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून हे धान्य घेऊन जावे, असे आवाहनही संजय केणेकर यांनी केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.