औरंगाबाद : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (सीटीईटी) रविवारी (ता.३१) शहरातील ३९ केंद्रांवर सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण १५ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेत असलेल्या सीबीएसई बोर्डाने प्रत्येक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे तापमान तपासून प्रवेश देण्यात आला. प्रत्येक वर्गात फक्त १५ ते २० उमेदवारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बसवण्यात आले होते.
उमेदवाराने परीक्षा केंद्रांवर ५० मिलीलीटर पारदर्शक बाटलीमध्ये स्वतःचे सॅनिटिझर, पाण्याची पारदर्शक बाटली, तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घातलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. तसेच प्रवेशपत्र, ओळखपत्र, आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तपासण्यात येत होते. शहरात एकूण ३९ केंद्रांवर सीटीईटीच्या परीक्षेला एकूण १५ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.