जनता कर्फ्यू दरम्यान कंपनी बंद राहिल्यास होणार कपात 

जनता कर्फ्यू दरम्यान कंपनी बंद राहिल्यास होणार कपात 


औरंगाबाद : कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. यात जवळपास दीड ते दोन महिने जिल्ह्यातील कंपन्या कारखाने बंद होते. आता ते रुळावर येत आहेत. यातच औरंगाबादमधील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या बजाज ऑटोने कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

१० ते १८ जुलैदरम्यान वाळूज प्लँट बंद राहिल्यास या नऊ दिवसांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याविषयीचे नोटीसही कंपनीने काढली आहे. यामुळे निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

२४ एप्रिलपासून बजाज कंपनी पुन्हा सुरू झाली. लॉकडाउनमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कंपनीचे प्रॉडक्शनही वाढले होते. बाहेरील ऑर्डरही मिळाल्या आहेत; मात्र नऊ दिवसांच्या जनता कर्फ्यूमुळे आता पुन्हा काम बंद राहणार आहे.

या नऊ दिवसांचा पगार ५० टक्के केला जाणार असल्याचे कंपनीने काढलेल्या नोटिसीत म्हटले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी आठ व नऊ जुलैदरम्यान कंपनीत हजर होणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर १९ जुलैला कंपनी नियमित सुरू होणार आहे. बजाज कंपनीत आठ ते दहा हजार कायम कर्मचारी आहेत.

दरम्यान, याविषयी कंपनीच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, वेतन कपातीबाबत कुठलाच निर्णय झालेली नाही. नऊ दिवस कंपनी बंद राहणार आहे. याच्या सूचना व परिपत्रक निघाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. याविषयी सोमवारी (ता.सहा) कंपनीची बैठक झाली, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com