गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्यावर किरीट सोमय्या म्हणाले, मुंबई पोलिस काहीच करत नव्हते

Kirit Somaiya
Kirit Somaiya

औरंगाबाद - दर महिन्याला १०० कोटी गोळ होत होते. त्यातील अनिल देशमुखांकडे आणि अनिल परबांच्या द्वारा मुख्यमंत्री कार्यालयाकडे किती रक्कम जात होती. हे लोकांना कळेलच, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली. ते आज सोमवारी (ता.पाच) औरंगाबादेत बोलत होते. श्री.सोमय्या म्हणाले, की उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते. अनिल देशमुख व उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुली प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांची सीबीआयद्वारे चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Edited - Ganehs Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com