औरंगाबाद: कोरोनाविरोधातील लढाईसाठी २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यूने लॉकडाउनची सुरवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तीन लॉकडाउन झाले. आता ३१ मेपर्यंत चौथ्या लॉकडाउनची घोषणाही झाली. लॉकडाउनचा प्रत्येक घटकाला फटका बसलाय. आता लॉकडाउन हटविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. तशी मागणी औरंगाबादेतील अनेक संस्था, संघटनांनी केली आहे.
जोपर्यंत लस अथवा उपचार येत नाही तोवर लॉकडाउन सुरू ठेवता येणार नाही, हे वास्तव मान्य करण्याची आवश्यकता आहे. काही युरोपीय विकसित देशांमध्ये लॉकडाउन नसताना काही निर्बंध लादले असता लोकांचा रस्त्यावर उद्रेक निर्माण झाला.
त्यामुळे लॉकडाउन हटविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन, औरंगाबाद, भालचंद्र कानगो, सुभाष लोमटे, उद्धव भवलकर, देविदास तुळजापूरकर, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मासिआ) औरंगाबाद, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) औरंगाबाद, क्रेडाई औरंगाबाद, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर्स औरंगाबाद, जिल्हा व्यापारी महासंघ औरंगाबाद, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स औरंगाबाद, रोटरी क्लब फॅमिली, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडिया, औरंगाबाद शाखा अशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
काही प्रमुख कारणे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.