बाजार समितीत सुरू झाले विकासकामांवरून राजकारण

 Politics In Auranngabad APMC about Development Works Marathi News
Politics In Auranngabad APMC about Development Works Marathi News

औरंगाबाद : बाजार समितीत अडीच वर्षांनंतर पुन्हा भाजप-काँग्रेसचे राजकारण रंगू लागले आहे. ५ ऑगस्टला बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपली. त्यानंतर समितीचा कारभार आता प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे.

भाजप मुदतवाढीसाठी न्यायालयात गेले तर काँग्रेसने प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. भाजप अडीच वर्षांत केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे, तर काँग्रेसकडून काही कामे बंद पाडण्यात आल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात येत आहे. 

बाजार समितीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आरोप-प्रत्यारोपांसह प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न काही संचालकांतर्फे केला गेल्याचा प्रकारही घडला आहे. एवढेच नव्हे, तर आता कोणतीही निवडणूक नसताना बाजार समितीत काँग्रेस व भाजप आपआपली ताकत दाखवत आहेत.

गेल्या अडीच वर्षात बाजार समितीचे रूप पालटले आहे. करमाड येथील उपबाजारपेठही आधुनिकरीत्या उभारण्यात आली आहे. यात गेल्या संचालक मंडळाच्या काळात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते.

माजी खासदार चंद्रकांत खैरे व विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनीही एकमेकांवर आरोप केले होते. आता प्रशासक येण्यापूर्वी ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या धनादेशावरून भाजप आणि काँग्रेस संचालकांचा गोंधळ झाल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर रस्त्याच्या कामातही काही संचालकांनी अडथळा आणला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com