औरंगाबाद, ता. 14 : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मराठवाड्यातील दोन जागांसाठी सात उमेदवार मैदानात आहेत. भाजपकडून दोन तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनकडून प्रत्येकी एका उमेदवाराने बंडखोरी केली आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी (ता. 14) शेवटची तारीख होती. शनिवारी (ता. 15) चिन्हांचे वाटप होणार आहे.
हेही वाचा राज ठाकरे अडकले, आणि मग...
या बाजार समितीच्या 25 जागांसाठी 29 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या बाजार समितीवरील राज्यातील प्रत्येक विभागातून दोन संचालकाची निवड करण्यात येते. पंधरा वर्षांपासून या बाजार समितीची निवडणूक झाली नव्हती. यामुळे पंधरा वर्षांपासून ही बाजार समिती प्रशासकाच्या माध्यमातून चालविण्यात आली. यात मराठवाड्यातून विविध बाजार समितीतून दोन संचालकांची निवड केली जाते.
निवडणुकीत रंगत
मराठवाड्यातून भाजपतर्फे औरंगाबादेतून राधाकिसन पठाडे, चाकूर बाजार समितीचे प्रशांत पाटील, कॉंग्रेसकडून वैजीनाथराव शिंदे, राष्ट्रवादीकडून माजलगावचे अशोक डक, कॉंग्रेसकडून अशोक शिवाजीराव निलंगेकर यांनी बंडखोरी केली. हिंगोलीचे राजेश पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. तीन मार्चला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
957 मतदार निवडणार दोन संचालक
मराठवाड्यातून मुंबई बाजार समितीवर दोन संचालक निवडून जाणार आहेत. यासाठी मराठवाड्यातून सात उमेदवार रिंगणात आहे. यात कॉंग्रेस, व शिवसेनकडून बंडखोरी करण्यात आली आहे. या सात उमेदवारांतून 957 मतदार संचालकांची निवड करणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.