हिंगोली : आषाढी एकादशीला केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने दिंड्या, पालख्या पंढरीच्या दिशेने पोचत आहेत. आषाढी एकादशी गुरुवारी (ता. २९) आहे. वारकरी भाविक आणि प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी २५ जून ते ४ जुलैदरम्यान ३४ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती हिंगोली एसटी महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली.
एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जमणाऱ्या लाखो भाविकांसाठी विशेष बसच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वारकरी, तसेच प्रवाशांचा सुखकर प्रवास, पंढरपूरजवळ तात्पुरते बसस्थानक, प्रवाशांसाठी न्याहरीची व्यवस्था अशी कामे पूर्ण झाली आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी वरील कालावधीत विशेष बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. हिंगोली आगारातून ३४ गाड्या धावणार आहेत.
वारीसाठी सर्व गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. त्याचबरोबर २४८ चालक, वाहकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यासह वाहतूक पर्यवेक्षक, यांत्रिक कर्मचारी, मार्गदर्शक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
‘एसटी आपल्या दारी’ सेवा सुरू
जिल्ह्यातील कोणत्याही गावातील भाविकांना विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी थेट गावातून एसटीचे आरक्षण करता येणार आहे. वारकऱ्यात ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या अधिक असते. एखाद्या गावात ४४ वारकरी एकत्र आले तर विठूरायाच्या दर्शनासाठी जात असतील तर एसटी थेट आपल्या दारी सेवा सुरू आहे.
आषाढी एकादशीला भाविकांसाठी हिंगोली आगारातून ३४ बसची सोय केली आहे. २५ जूनपासून ते ४ जुलैपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत. मागणीनुसार बस सोडल्या जातील. सवलतीच्या तिकिटांसह यंदा महिलांना ५० टक्के तिकिटामुळे संख्यावाढ अपेक्षित आहे.
- फेरोज शेख, वाहतूक निरीक्षक एसटी हिंगोली आगार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.