अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकीची- नवाब मलिक

फोटो
फोटो

नांदेड : आमचे तीन पक्षांचे सरकार व्यवस्थीत सुरू असून किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतले आहे की राज्यघटनेनुसार काम करू अन्यथा कॉंग्रेस सत्तेतून बाहेर पडणार असे वक्तव्य श्री. चव्हाण यांनी नांदेडच्या एका कार्यक्रमात केले होते. त्यांना प्रतिउत्तर म्हणून नवाब मलिक यांनी त्यांच्या वक्तव्याचे खंडन केले. कुठल्याच पक्षांनी काही लिहून दिले नाही असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र श्री. चव्हाण यांनी असे बीनबुडाचे वक्तव्य करायला नको होते असा पलटवार नवाब मलिक यांनी टाकला. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून काहीही लिहून घेतले नाही. तिन्ही पक्षांचे म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसनी मिळून किमान समान कार्यक्रमासाठी स्वाक्षऱ्या केल्या. मात्र नांदेडमध्ये अशोक चव्हण यांनी असे बोलायला नको होते. नांदेडमधील एका कार्यक्रमात अशोक चव्हाण म्हणाले की, तिन पक्षांच्या सरकारला कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा विरोध होता. शिवसेनेने घटनेमुसार जर काम नाही केले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू. असे वक्तव्य केल्यानंतर यावर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण यांची बोलण्याची पध्दत चुकली आहे. केवळ शिवसेनेकडून लिहून घेतले नाही तर किमान समान कार्यक्रमावर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता

दरम्यान नांदेडमध्ये बोलतांना अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापन करण्याविषयी प्रजासत्ताक दिनी गौप्यस्फोट केला होता. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर घटनेच्या चौकटी बाहेर जाऊन काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असे वक्तव्य केले होते. 

सध्या मल्टीस्टारचा जमाना 

तसेच राजकारण असो की, चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन्ही सारखेच आहेत. सध्या मल्टीस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगेवेगळी जरी असली तरी विकासासाठी व किमान समान कार्यक्रमासाठी एकत्र आलो. व सध्या आमचा चित्रपटचांगला सुरू आहे. घटनेच्या आधारावर सररकार चाललेल पाहिजे असे मत आमच्या पक्षाचे असून घटनाबाह्य काम झाल्यास आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सुचना सोनिया गांधी यांनी आम्हाला दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही घटनेच्या चौकटीतच राहून राज्याचा कारभार केल्या जाईल असा विश्‍वास दिल्याचे श्री. चव्हाण यांनी केले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com