औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुन्हा नामांतरणाचे राजकारण पेटले आहे. आता चिकलठाणा विमानतळाचे संभाजी महाराज विमानतळ असे नामांतरण करावे, यावरुन भाजप व शिवसेना आमने-सामने आले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) बुधवारी (ता.१६) औरंगाबादमध्ये आले. या प्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. औरंगाबादच्या विमानतळाच्या नामांतरासाठी माजी केंद्रीय उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी चर्चा केली असल्याचे कराड यांनी सांगितले. देशातील १३ विमानतळांच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झाला असून यात राज्यातील कोल्हापूर, शिर्डी विमानतळांचा समावेश आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) अज्ञानी आहेत. (Bhagwat Karad Criticize Chandrakant Khaire Over Renaming Aurangabad Airport)
त्यांना याबाबत कल्पना नसल्याने त्यांनी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली, असा टोला कराड यांनी लगावला. शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असा सल्ला त्यांनी खैरे व शिवसेनेला दिला. नामांतरासाठी अनेक महिन्यांपासून केंद्राकडे पाठपुरावा करित आहे. माजी व आजी उड्डाणमंत्र्यांशी चर्चा केली. फक्त औरंगाबादच्या (Aurangabad) विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न नाही तर देशातील १३ विमानतळाचे प्रस्ताव आले आहेत. या शिवाय इतरही प्रस्ताव प्राप्त होण्याची शक्यता असून ते आल्यानंतर नामांतर होईल, असा विश्वास भागवत कराड यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.