Leopard : काळ बसलाय पावलोपावली दबा धरून

रात्री पिकाला पाणी भरण्यासाठी गेल्यावर विंचू, सर्पाचा धोका तर दुसरीकडे रानडुकरांसह बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना नेहमी जिवाचा धोका असतो.
Leopard
LeopardSakal

छत्रपती संभाजीनगर - रात्री पिकाला पाणी भरण्यासाठी गेल्यावर विंचू, सर्पाचा धोका तर दुसरीकडे रानडुकरांसह बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना नेहमी जिवाचा धोका असतो. मात्र, कुटुंब, घर संसार चालविण्यासाठी पोटच्या लेकरासारख्या जीव लावलेल्या पिकांना पाणी द्यावेच लागते. ही सगळी मेहेरबानी सरकारची. त्यांना दिवसरात्र उद्योगधंद्यांना वीज द्यायची. तर जगाच्या पोशिंद्याला रात्रीची वीज द्यायची.

'शेतात पिकांना पाणी देताना कोण कधी काळ बनून येईन, याचा नेम नाय. किती दिवस आम्ही रोज कनकन मरायचं”, असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला. शुक्रवारी जिल्ह्यात ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी विविध ठिकाणी रात्री शेतात ग्राउंड रियालिटी जाणून

दिवसा शेतात राबल्यानंतर खरे तर रात्री आराम करण्याची वेळ. मात्र, सरकारच्या मेहरबाणीमुळे रात्रीही बळिराजाच्या नशिबी आराम शक्य नाही. शेतकऱ्यांना एक आठवडा दिवसा वीज असते. त्यातही सतरा विघ्ने येतात, तर एक आठवडा रात्रीची वीज देण्यात येते. शुक्रवारी रात्री साधारण १० च्या सुमारास शेतामधील रोहित्राची वीज आली.

नेमकं जेवण करून डोनवाडा गावचा हा तरुण शेतकरी बाजीवर बसला होता. त्याचवेळी बाजूच्या शेतकऱ्याचा आवाज आला ‘बापू चला लाइट आली.’ यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत हा शेतकरी कानटोपी घालून चादर, बॅटरी हातात गेऊन थेट शेताच्या दिशेने निघाला.

तोच घरातून त्याच्या आईचा आवाज आला, ‘पाणी भरताना काळजी घे जो रे बाळा… शेतात इंचू, काट्याचं भेव हाय. बाजूच्या रानात बिबट्या दिसलाय. त्यामुळे हातात मोठी काठी ठेव रे बाळा... अन् शेतात पाणी भरल्यावर बाजीवर झोप आ...!’ त्यानंतर बापूने प्रतिसाद दिला ‘हो गं माय... घेतो काळजी.’

यानंतर पुढे एक ते दीड किलोमीटर चालत गेल्यानंतर या शेतकऱ्याने स्वतः एका काठीच्या मदतीने डीपीवरील पडलेला डिव टाकला. येथेही शेतकऱ्याच्या जिवाला धोकाच.. पुढे गेल्यानंतर डोंगराच्या कडेला आणि कड्याकपारीच्या बाजूला असलेल्या एका नालीत या बळिराजाने विहिरीवरील स्टार्टर सुरू केले.

विशेष म्हणजे याच परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर बिबट्याने वासराचा फडशा पाडला होता, तर काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याने एका वनरक्षकावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे किर्रर अंधार आणि त्यात विंचू, काटा, हिंस्र प्राण्याची भीती असूनही या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही भीतीचा आवेश दिसून येत नव्हता.

कुणीतरी दिवसा वीज देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात बिबट्यांसह अन्य हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात कुणी बाप गमावला, कुणी पती गमावला तर कुणी तरुण मुलगा गमावला. हे सर्व सरकारी अनास्थेचे बळी असून आणखी किती दिवस आम्हाला दिवसाच्या विजेसाठी यातना सहन कराव्या लागणार, अशी वेदना शेतकऱ्यांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com