
Sambhaji Nagar: सध्या पावसाचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळं झाडं, वीजेचे खांब कोसळतात. याबाबत संबंधित यंत्रणांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पण कामचुकारपणा आणि असंवेदनशीलतेचा कळस असलेल्या सरकारी व्यवस्थेला यामुळं मोठा अपघात घडू शकतो, कोणाचा जीवावर एखादी गोष्ट बेतू शकते याची माहिती असते तरीही ते ढिम्म हलत नाहीत.
याचचं एक ताज उदाहरण सध्या समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा रेल्वे स्टेशनजवळ महावितरणनं दोन शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे. या मृत्यूंची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.