

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पैठणमध्ये एक सभा आयोजित केली, ज्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी, ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनाही टोला लगावला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी वाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली यावर ताशेरे ओढले.