लातुरात कोरोनाचा धोका वाढला! अकराव्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार

दहा दिवस नवीन रुग्णांची संख्या शंभराच्या आतमध्ये होती. पण, अनलॉकमध्ये नागरिक कोरोनाच्या उपाय-योजना धाब्यावर बसवून फिरत आहेत
covid 19
covid 19covid 19

लातूर: जिल्ह्यात लॉकडाउनचा चांगला परिणाम दिसून आला होता. पण, नंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. याचाही परिणाम आता दिसून येत आहे. दहा दिवस नवीन रुग्णांची संख्या शंभराच्या आतमध्ये होती. पण, अनलॉकमध्ये नागरिक कोरोनाच्या उपाय-योजना धाब्यावर बसवून फिरत आहेत. त्यामुळे आता रुग्ण वाढताना दिसत आहेत. अकराव्याच दिवशी रुग्णांची शंभरीपार झाली आहे. रुग्णांची संख्या वाढणे हे जिल्ह्यासाठी पुन्हा चिंताजनक व धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आतापासूनच पुन्हा एकदा उपाय योजनांची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यात एकूण बाधितांच्या संख्या ९० हजारांच्या घरात गेली आहे. एप्रिलमध्ये तर कोरोनाचा कहर होता. पण, मेमध्ये हळूहळू संख्या कमी होत गेली. यात पुन्हा दीड दोन महिने लॉकडाउन राहिले. याचा परिणाम मे अखेरीस तसेच जूनमध्ये दिसून येऊ लागला होता.

जूनच्या पहिले दोन दिवस शंभर पेक्षा जास्त रुग्ण होते. ता. तीन जूनपासून मात्र शंभरच्या आतमध्येच रुग्ण राहिले होते. ता. सहा व बारा जूनला तर सर्वांत कमी म्हणजे जिल्ह्यात केवळ ४४ नवे रुग्ण समोर आले होते. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत चालल्याने समाधान व्यक्त केले जात होते. आरोग्य विभागावरच मोठा ताण कमी झाला होता. ता. तीन जूनपासून ते ता. बारा जूनपर्यंत म्हणजे दहा दिवस कोरोनाचे नवे रुग्ण शंभराच्या आतमध्ये राहिले. पण, अकराव्या दिवशी मात्र नव्या रुग्णांची शंभरी पार झाली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हा अनलॉक असून, त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. असेच रुग्ण संख्या वाढत गेली तर जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब ठरणारी आहे.

covid 19
राज्य सरकार सरकारी दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याची माहिती सादर करणार

बाजारपेठ अनलॉक; यंत्रणा लॉकडाउनमध्ये
लातूर जिल्ह्यात रुग्ण संख्या अत्यंत कमी झाली. ऑक्सिजन बेडही मोठ्या प्रमाणात रिकामे झाले. त्यामुळे जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आला. सर्व व्यवहार सुरू झाले. वीकेंड लॉकडाउनही उठवण्यात आला. याचा परिणाम बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शारीरिक अंतराचा फज्जा उडत आहे. मास्क विना नागरिक बिनधास्त फिरत आहेत. कोरोनाची भीती गायब झाली आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र सध्या लॉकडाउनमध्ये आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात नाही. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई नाही. असाच प्रकार चालू राहिला तर पुन्हा जिल्हा लॉकडाउनच्या दिशेने जाण्यास काहीच वेळ लागणार नाही. याकडे आतापासूनच लक्ष देण्याची गरज आहे.

आकडे बोलतात....
तारीख--- रुग्णसंख्या
तीन जून---७९
चार जून---८६
पाच जून---९९
सहा जून ---४४
सात जून---४८
आठ जून --५८
नऊ जून---५२
दहा जून---६१
अकरा जून---५६
बारा जून--४४
तेरा जून--१०५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com