वीज जोडल्याने लातूरचा पाणीपुरवठा सुरू, वीस दिवस राहिली निर्जळी

वीज जोडल्याने लातूरचा पाणीपुरवठा सुरू, वीस दिवस राहिली निर्जळी

लातूर ः महावितरणने वीज बीलाच्या कारणावरून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच योजनेचा वीज पुरवठा तोडला होता. त्यामुळे गेल्या वीस दिवसापासून शहरात निर्जळी होती. अखेर महापालिकेने मंगळवारी (ता.२५) ६७ लाख रुपये वीज बील भरल्यानंतर महावितरणने वीज जोडणी केली. त्यानंतर मांजरा धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बुधवारपासून (ता.२६)वेळापत्रकानुसार शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.


मांजरा धरणात अत्यल्प पाणी असल्याने दहा दिवसापासून एकदा शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात ता.18 फेब्रुवारी रोजी महावितरणने वीज बिलाच्या थकबाकीसाठी पाणी पुरवठ्याच्या सर्वच योजनेचा वीज पुरवठा तोडला होता. त्यामुळे शहरात निर्जळी होती. यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (ता.२४) महापालिकेसमोर रिकाम्या घागरी घेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. याच दिवशी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महावितरणमध्ये जाऊन तेथील अभियंत्यांनाही धारेवर धरले होते. शेवटी एक महिन्याचे वीज बील भरल्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला.

त्यानंतर मंगळवारी आर्वी जलशुद्धीकरण केंद्र, वरवंटी, हरंगुळ, साई हे़डवर्क्स, नागझरी येथील योजनेचे सप्टेंबर व ऑक्टोबरचे वीज बील ४३ लाख ३४ हजार ६१६ तर धनेगाव येथील मांजरा धरणावरील ऑगस्टचे २३ लाख ९८ हजार ५२३ असे एकूण ६७ लाख ३३ हजार १३९ रुपये वीज बील महापालिकेने भरल्यानंतर महावितरणने मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजता सर्वच पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे मांजरा धरणातून सायंकाळी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. बुधवारपासून शहराला वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com