

Manoj Jarange Patil
esakal
- दिलीप दखणे
वडिगोद्री जि. जालना - मरेन पण मागं हटणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' उद्याच सोमवार ता. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार, मुंबईला जायचा शब्द मागे घेतला जाणार नाही. यामुळे समाजाच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही ठरलेल्या मार्गानेच मुंबईला जायचं माझ्यासोबत 2 अँबुलनस असतील 10 माणसांपेक्षा माझ्यासोबत कुणीही असणार नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथ रविवार ता. 14 उपोषणाच्या सतराव्या दिवशी पञकारांशी संवाद साधताना सांगितले.