लातूर : राज्यात माकड तसेच वानरांची संख्या वाढत आहे. माकड, वानरांकडून फळबागांचे नुकसान होत आहे. यावर आता उपाय म्हणून राज्य शासनाने माकड, वानरांची नसबंदी (निर्बीजीकरण) करण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास माकड, वानरांची संख्या नियंत्रणात येईल, फळबागांच्या नुकसानीला आळा बसेल, अशी शासनाची धारणा आहे. राज्यात ठिकठिकाणी लवकरच नसबंदीसाठी केंद्रेही उभारली जाणार आहेत. मोकाट कुत्र्यांपाठोपाठ आता माकडांच्या निर्बीजीकरणाचा प्रयोग राज्यात पहायला मिळणार आहे.
माकड, वानरांमुळे फळझाडांचे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने २०२२ मध्ये प्रधान सचिव (वने), महसूल व वनविभागाचा समावेश असलेल्या अभ्यासगटाची स्थापना केली होती. अभ्यासगटाने शासनास अहवाल सादर केला आहे. फळझाडांचे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड, वानरांचे निर्बीजीकरण करण्याची शिफारस अभ्यासगटाने शासनाला केली होती. त्यातून शासनाने आता एक टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
माकड, वानरांची संख्या वाढत असूनही ते टोळीने राहतात. टोळीनेच ठिकठिकाणी भटकंती करतात. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. हे लक्षात घेऊन शासनाने टास्क फोर्स स्थापन केला आहे. माकड, वानरांची प्रजनन संख्या कमी करून हे नुकसान टाळण्याचा प्रयत्न आहे. याबाबतची कार्यपद्धती लवकरच राबवली जाणार आहे.
- सचिन रामपुरे,
वन परिक्षेत्र अधिकारी, लातूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.