Jalna News : अंबड शहरात अल्पवयीन मुले पळवतात सुसाट वाहने ; व्यावसायिक, पादचारी यांना करावा लागतोय त्रास सहन

शहरात दिवसरात्र भरधाव वेगाने दुचाकी, चारचाकी वाहन चालविण्याची जणू काही स्पर्धाच सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा किंवा साधा शिकण्याचा परवाना नाही; परंतु वाहन चालविण्यासाठी चांगलीच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
jalna
jalnasakal

अंबड : शहरात दिवसरात्र भरधाव वेगाने दुचाकी, चारचाकी वाहन चालविण्याची जणू काही स्पर्धाच सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा किंवा साधा शिकण्याचा परवाना नाही; परंतु वाहन चालविण्यासाठी चांगलीच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाण, धार्मिकस्थळ, शाळा, महाविद्यालय परिसर यासह आदी ठिकाणी नेहमीच अल्पवयीन मुलं घरातून दुचाकी, चारचाकी घेऊन सर्रासपणे दिवसरात्र बाहेर पडतात. वाहन चालविताना हॉर्णचा कर्कश आवाज करत, वाहनांची फायरिंग वाढवत प्रदूषण वाढवितात.

याचा त्रास रस्त्यावरील पादचारी, व्यावसायिक यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहन चालविताना कट मारणे, जोराचे अचानक ब्रेक मारणे, रस्त्यावर अनेकवेळा दुचाकी, चारचाकी वाहन उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे; तसेच अशा वेळेस वाहनाचा धक्का लागला की, वादविवाद, भांडणतंटा होणे हे नित्याचे झाले आहे. याचबरोबर छोटे-मोठे अपघात घडत आहे.

jalna
Jalna Crime : वाढदिवसाच्या पार्टीत एकाचा खून ; जालना शहरात जुन्या वादातून घटना

याला खऱ्या अर्थाने पालक जबाबदार आहे. मुलांचे लाड करण्याच्या काही पद्धती असतात, मात्र पालकांनी एवढे जास्तीचे मुलाचे लाड करू नये जेणेकरून वाहन चालविण्याचा परवाना नसताना एखाद्याच्या जिवावर बेतू शकेल. असे गैरवर्तन घडता कामा नये. याची काळजी पालकांनी स्वतःहून घेणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. यामुळे शहरात असे गैरवर्तनाचे प्रकार सतत सुरूच आहेत. यामुळे शहरातील नागरिक पूर्णपणे कंटाळले आहे. पालकांनी आपल्या मुलावर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे.

शहरात किंवा रस्त्यावर वाहतुकीचे नियम हे प्रत्येकानेच पाळायला हवेत. रस्त्यावरील पादचारी, निष्पाप लोकांचा भरधाव वेगात बळी जाण्याचे प्रणाम वाढत चालले आहे. पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष दिल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास खऱ्या अर्थाने मदत होईल.

— डॉ.रामनाथ तिकांडे, नागरिक अंबड.

वाहन चालविण्याचा परवाना असेल तरच वाहन चालविणे हे प्रत्येकाच्या हिताचे आहे. शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ता, चौक यासह आदी गर्दीच्या ठिकाणी अपघात प्रमाण वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन चालविण्यास न देणेच हेच महत्त्वाचे आहे.

— रघुनाथ नाचण, पोलिस निरीक्षक, अंबड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com