

The Maharashtra government has clarified that the viral 'Chief Minister Bal Ashirwad Yojana' message is fake and no such scheme exists.
Sakal
मुनाफ मुमताज/आजीज शेख
आडूळ : सोशल मीडियासह काही शाळांमधून "मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना" या नावाचे पत्रक आडूळ सह पैठण तालुक्यातील विविध व्हाट्स अप, फेसबुक वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रकात इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांपैकी १ मार्च २०२० नंतर पालक किंवा पालकांपैकी एकाचा मृत्यू झालेल्या आणि १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.