रेशीम उद्योगाच्या वाटचालीचा आढावा

जिल्हाधिकारी राठोड यांची ठिकठिकाणी भेट
जिल्हाधिकारी राठोड
जिल्हाधिकारी राठोड sakal

जालना : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी बुधवारी (ता.१५) ठिकठिकाणी भेटी देत रेशीम उद्योगाच्या वाटचालीचा आढावा घेतला. देवमुर्ती (ता.जालना) येथील आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या ॲटोमॅटीक रेशीम रिलींग युनिटला भेट देऊन त्यांनी माहिती घेतली.

महाराष्ट्रात राज्यात सर्व प्रथम सुरू केलेले हे रेशीम रिलींग युनिट असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्माण झाला आहे.तसेच जालना रेशीम कोष बाजारपेठेतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषांना चांगला दर मिळत आहे. या युनिटमधून निर्यातक्षम ४ ए ग्रेडचा दर्जेदार निर्यातक्षम रेशीम धागा तयार होत आहे. ॲटोमॅटीक रेशीम रिलींग युनिटचे संचालक सूरज टोपे यांनी जिल्हाधिकारी यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर कचरेवाडी (ता.जालना) येथे जिल्हाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थी शिवाजी जाधव यांच्या रेशीम किटक संगोपन कामाची पाहणी केली. प्रसंगी तसेच उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरिष्ठ तांत्रिक सहायक एन.टी.दखनी तसेच कचरेवाडी गावातील मनरेगा योजनेचे लाभार्थी राजेंद्र कचरे, हरिभाऊ ठोकळ, मदनराव जाधव, शंकर कचरे, अप्पासाहेब कचरे, ग्रामरोजगारसेवक लहु जाधव हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राठोड
मराठवाड्यातील मुख्य पिक 'सोयाबीन' धोक्याच्या पातळीवर

हरिभाऊ ठोकळ यांचे कडे दोन एकर तुती लागवड असून प्रत्येक महिन्यात त्यांचे ९० हजार ते ९६ हजार रुपये रेशीम कोष विक्रीपासून होतात. लाभार्थी शिवाजी जाधव यांनी मनरेगा योजने मधून किटक संगोपन गृह उभारणी करिता अनुदान मिळाले तसेच प्रत्येक पिकाच्या वेळेस मजुरी मिळाली. त्यामुळे रेशीम उद्योग उभारणी करिता मोठा आधार मिळाला, अशी माहिती त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली. लाभार्थी राजेंद्र कचरे, यांनी आम्ही गेल्या १६ वर्षांपासून रेशीम उद्योग करीत असून यामुळे उत्पादन वाढीस खूप फायदा झाला असे त्यांनी सांगितले.

कचरेवाडी येथेच विजय पाटील यांच्या सॉइल टु सिल्क या चाकी केंद्रास जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन चाकी कीटकांची पाहणी केली. चाकीमुळे रेशीम शेतकऱ्यांच्या उत्पादनात कशी वाढ झाली, याची माहिती समजावून घेतली.एकंदरीत रेशीम कोषविक्रीपासुन मिळणारे प्रति एकर वार्षिक दोन लाख रुपयांचे उत्पादन व मनरेगामधुन मिळणारा मोबदला, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादनामध्ये वाढ होऊन ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राठोड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com