वसमत : हिंगोली जिल्ह्यांमध्ये वर्गखोल्या नसताना जिल्हा नियोजन समितीकडून मात्र सीसीटीव्ही बसविण्याची घाई केली जात आहे अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी विधानसभेत व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात शाळा खोल्यांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक ठिकाणी शाळा खोल्या नाहीत. एकीकडे शिक्षणाचा दर्जा उंचावत असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याची खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अनेक ठिकाणी वर्गखोल्या नसताना मात्र त्याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम केले जात आहे. जिल्हा नियोजन समितीमधून शाळाखोल्यांचे बांधकाम मंजूर केले जात नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यात शासनाने शाळाखोली बांधकामाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.
राज्यातील अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी, डाटा इंट्री ऑपरेटर ग्रामपंचायत कर्मचारी मागील काही दिवसांपासून थंडीत आंदोलन करीत आहेत. या सर्वांचे प्रश्न शासनाने सोडवले पाहिजे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. या शेतकऱ्यांचे खाते सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणीही आमदार नवघरे यांनी केली.
राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांचे मोठ्या संख्येने पद रिक्त आहेत. सदरील पदे तातडीने भरावीत तसेच महाविद्यालयांमधून व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना कायमस्वरूपी नियुक्त द्याव्यात अशी मागणी नवघरे यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.