औसा (जि.लातूर) : औसा तालुक्याला रेशीम उत्पादनाचे केंद्र करण्याचे स्वप्न उराशी बाळगत आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना ठोस उत्पादन मिळावे म्हणून येथील विजय मंगल कार्यालयात क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या रेशीम परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (ता.२१) आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या रेशीम परिषदेच्या माध्यमातून रेशीम उद्योगातील अडचणी, संधी आणि विक्री यावर सखोल, तंत्रशुद्ध माहिती मिळावी आणि पारंपरिक शेतीत बदल घडावा, यातून सतत दुष्काळाशी सामना करतांना शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हा उदात्त हेतू आहे.
यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे (औरंगाबाद) डी. के. हाके, रेशीम तज्ज्ञ डॉ.एल.जी.कलंत्री, डॉ.अधिकराव जाधव, चॉकी तज्ज्ञ विजय पाटील, हेमंत पाटील, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे श्री.देशमुख, तहसीलदार शोभा पुजारी, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता यांच्यासह शेतकरी उसस्थित होते.
हेही वाचा - VIDEO : सासऱ्याने पुरविला सुनेचा हट्ट : घरावर उभारला अश्वारुढ पुतळा
प्रास्ताविकेत श्री.पवार म्हणाले की, मी आमदार म्हणून निवडून येण्याअगोदर या तालुक्याच्या शेतकऱ्यांना दुष्काळ आणि नापिकीपासून कायमचे दूर करण्यासाठी विचार करू लागलो. येथील शेतकरी उसासारखी जास्त पाणी लागणारी आणि बेभरवशाची शेती करून आर्थिक संकटात सापडला आहे. उसासारख्या पिकाला रेशीम उद्योग हा चांगला पर्याय असल्याने मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. रेशीम शेतीचा सखोल अभ्यास केला वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. त्याच्यातील अडचणी समजून घेतल्यावर यामध्ये मोठा फायदा दिसून आल्याने आणि शेतकऱ्याला सहज करता येत असल्याने गावागावात रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. येथील शेतकरी पहिले ऊस उत्पादक होते. त्यानंतर ते सोयाबीन कडे वळले. मात्र आता तूती लागवड करून रेशीम उद्योगाकडे शेतकरी वळत आहे. शासनाच्या सर्व योजना, अनुदान मिळण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रेशीम उद्योगाकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले तर हे पीक महिन्याला लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. त्यामुळे औसा हे रेशीम उद्योगाचे केंद्र म्हणून देशात ओळखले जावे आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले तर शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडेल यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे' असे आवाहन त्यांनी केले.
येथे क्लिक करा -सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चंगळ : कशी ते वाचायलाच पाहिजे
अनुदानासाठी शेती करू नका
केवळ अनुदान भेटत आहे म्हणून या रेशीम शेतीकडे वळू नका तर यातून आर्थिक उन्नतीसाठी ही शेती करा, शासनाच्या सर्व अडीअडचणी सोडवायला मी तुमच्या सोबतच आहे. रेशीम उद्योगासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची हमी मी देतो. काही दिवसांतच आपले सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्ही मनात कोणताही किंतु परंतु आणू नका अशी आशा आमदार पवारांनी व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.