banana loss by storm wind hit in degloor
sakal
देगलूर - तालुक्यातील बेबंरा-मानूर परिसरात सोमवारी (ता. २२) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः केळी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे वादळामुळे वीज वितरण व्यवस्थाही विस्कळीत झाली असून अनेक गावांमध्ये तब्बल २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.