औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे अनेकांचा शेतमाल शेतातच आहे. त्यातच मराठवाड्यात रविवारी (ता. १०) काही तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशेवरही पाणी फेरले गेले.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वीज पडल्याने सहा, तर उदगीर तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोळेगाव, माळेगाव, पिंपळगाव रेणुकाई, तर बदनापूर तालुक्यातील शेलगाव, उज्जैनपुरी, अकोला, धोपटेश्वर भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बीडमध्येही आंबा, पपईची झाडे मोडून पडली, तर फळेही गळाली. टरबूज, खरबूज पिकांनाही मोठा फटका बसला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील काही गावांत गारपीट झाली.
जालना
लातूर
बीड जिल्हा
उस्मानाबाद
नांदेड जिल्हा
परभणी
हिंगोली
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.