लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक
लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक

मुंबई : लॉकडाऊन व त्यानंतरच्या अनलॉक काळात मध्य रेल्वे वेळोवेळी आपल्या पार्सल गाड्यांसह देशभरात सातत्याने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते 29 ऑगस्ट या कालावधीत 356 सेवांसह 11 हजार 400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची मालवाहतूक केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई व कल्याण येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या पार्सल गाड्यांमधून हजरत निजामुद्दीन, शालीमार, हावडा, सिकंदराबाद, चेन्नई, वाडी, नागपूर अशा अनेक ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, मशिनरीचे भाग, छापील साहित्य आणि टपाल बॅग अशा अंदाजे 8 हजार 8900 टन जड पार्सलची वाहतूक केली आहे. 

या काळात नाशवंत वस्तू व औषधांची वाहतूक करणे एक आव्हानात्मक काम होते. मात्र मध्य रेल्वेने देशाच्या विविध भागात 1 हजार 10 टन खाद्यपदार्थ, पेरीशेबल्स, 817 टन औषधे, आणि 673 टन रुग्णालयीन वस्तू, वैद्यकीय व शल्य चिकित्सा उपकरणांची वाहतकू केली आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com