प्रजासत्ताकदिनी 53 जोडप्यांचा सामुदायिक विवाह 

वासिंद : विवाह सोहळ्यात उपस्थित मान्यवर व जनसमुदाय (छायाचित्र : भगवान जाधव) 
वासिंद : विवाह सोहळ्यात उपस्थित मान्यवर व जनसमुदाय (छायाचित्र : भगवान जाधव) 

वासिंद : शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व वासिंदचे उद्योजक दत्तात्रेय ठाकरे यांनी आपल्या मुलीच्या विवाह प्रित्यर्थ इतर 52 वधुवरांचे विवाह देखील याच लग्मंनडपात रविवारी, 26 जानेवारी रोजी आयेजित केले व एकूण 53 वधुवरांचा एक दिवसीय भव्य विवाह सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर वासिंदमध्ये संपन्न झाला. आपल्या मुलीचा विवाह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाबरोबर झाला पाहिजे, ही सामाजिक जाणीव ठेवून ठाकरे यांनी हा उपक्रम राबविला. 

सामुदायिक विवाह सोहळ्यात वधुवरांना कपडे, कन्यादान, संसारोपयोगी भांडी, मंगळसूत्र, हारतुरे, भोजन आदी सर्व खर्च ठाकरे परिवारातर्फे करण्यात आला. महागाईच्या काळात लग्नकार्य भव्यदिव्य स्वरूपात करणे हे सर्वसामान्यांना न परवडणारे असते. तरीही दत्तात्रय ठाकरे यांनी केलेला गरीब व गरजूंसाठी आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा उदात्त भावनेने सामाजिक कार्याच्या जाणिवेतून साकारलेला असून, या सोहळ्यातून समाज नक्कीच प्रेरणा घेईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

या सोहळ्याला शिवसेना ठाणे जिल्हा (ग्रा.) प्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, तालुका प्रमुख मारुती धिर्डे, ग्रामीण संपर्क प्रमुख विठ्ठल भेरे, महिला जिल्हा संघटक रश्‍मी निमसे, आमदार शांताराम मोरे, आमदार दौलत दरोडा, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील, बांधकाम सभापती वैशाली चंदे, माजी बांधकाम सभापती बाळ्यामामा म्हात्रे, देवा ग्रुपचे तानाजी मोरे, कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षा अपर्णा खाडे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे आदींसह तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकिय पक्षांचे कार्यकर्ते व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. 

विकासात शहापूरचा प्राधान्य 
मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व वधुवरांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शरद पवारांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे. शहापूरच्या विकासामध्ये कुठेही काही बाधा येणार नाही, अडचण येणार नाही. जी काही प्रलंबित कामे आहेत ती जिल्ह्याचा विकास करतांना शहापूरला देखील प्राधान्य दिले जाईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com