

Residents of 14 merged villages face civic issues as administrative process in Navi Mumbai corporation remains incomplete.
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट होऊन चार महिने उलटले, तरी गावाची पाच ग्रामपंचायतींची दप्तरे अद्याप महापालिकेकडे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला १५ मेपर्यंतची मुदत देत, काम पूर्ण न झाल्यास महापालिकेवर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.