

Dahihandi Govinda Insurance
ESakal
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने राज्यातील सुमारे २ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या संदर्भात युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाला या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.