मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) 'एक भारत श्रेष्ठ भारत' योजनेअंतर्गत 'भारत गौरव पर्यटक ट्रेन' चालविण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन मुंबई ते रेणिगुंटा दरम्यान धावणार आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला चालणा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 00199 भारत गौरव टुरिस्ट ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गुरुवार ९ मार्च २०२३ रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल, वर्तुळाकार मार्गाने प्रवास करेल आणि १९ मार्च २०२३ रोजी परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन कल्याण, पुणे, वाडी, गुंटकल.
बेंगळुरू, व्हाईटफील्ड, तिरुनेलवेली, कोचुवेली, मदुराई, रेणिगुंटा आणि परत येताना दौंड, पुणे, कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहचणार आहेत.भारत गौरव टुरिस्ट ट्रेन देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या “देखो अपना देश” या उपक्रमाच्या अनुषंगाने आयआरसीटीसीने सुरू केली आहेत. टुरिस्ट ट्रेन ही एक सर्वसमावेशक टूर पॅकेजसह असणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.