शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा खून- जितेंद्र आव्हाड

कोणाच्या घरावर हल्ले करुन तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही
Jitendra Awhad
Jitendra Awhadsakal

ठाणे : मागील अनेक महिन्यांपासून विलिनीकरांच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करीत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पेढे वाटले. मात्र,आज जे काही घडले, कसे घडले, यावर मला बोलायचे नाही. परंतु ज्या पध्दतीने एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या व्यक्तीगत घरावर ज्या घरात त्यांच्या पत्नी राहतात, नात राहते त्या घरात अचानक घुसणे हा लोकशाहीचा महाराष्ट्रातील खून असल्याची टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

असे कोणाच्या घरावर हल्ले करुन तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही, त्याचा लोकांना किळस वाटायला लागला आहे. ८२ वर्षाचे पवार हे घरात असते तर ते या आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांची मुलगी गेली समोर, तिच्या रक्तात पवार यांचेच रक्त आहे, परंतु त्यांनाही धक्काबुक्की करता, हे चुकीचे असून याचा मी धिक्कार करतो असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक माणूस याचा धिक्कार करले असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकीकडे जयजयकार करता आणि दुसरीकडे पवार यांच्या घरावर हल्ला करता, त्यामुळे असेही समजू नका, समोरच्याने बांगडय़ा घातल्या आहेत. परंतु आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो, जिल्ह्या जिल्ह्यात हा पक्ष असून प्रत्येक ठिकाणी आमची ताकद आहे.

परंतु आम्ही लोकशाहाची सन्मान करणारे असल्याने आम्ही असे काही करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु तुम्ही जर आमच्या नेत्याच्या घरार्पयत जाणार असाल तर आम्ही त्याचा निषधे करतो. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीक याचा निषेध करत आहे. आम्ही शांततेचा मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी हे केले, त्यांनी इतिहास तपासावा, पाच - युनियनचे अघोषीत नेते शरद पवार हे गेले पाच दशके नेते आहेत. जुन्या एसटी कर्मचाऱ्यांना विचारुन बघा, असा सल्लाही त्यांनी दिला. परंतु आता नवीन जे काही जन्माला आले ते महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकतर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले. कोर्टात निकाल लागला, तुम्ही कोर्टाचा जयजयकार केला, परंतु अचानक तुम्ही परत घरात घुसता. हे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगत ही घटना निंदनिय असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आजर्पयत असे कधीही घडलेले नाही. गोपीनाथ मुंढे यांनी १९९३ साली शरद पवार यांच्यावर शाब्दीक टिका केली. मात्र त्यावेळेस याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील हा विचार मनात ठेवून शरद पवार यांनी रात्री २ वाजता पोलिसांची बैठक घेऊन मुंढे यांची सुरक्षा दुप्पट केली हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा स्पर्श असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला सोनेरी झालरच ही वेगळी आहे. एकमेकांवर टिका करुनसुध्दा दुस:याच्या व्यक्तीगत जीवनाचा सन्मान करायचा, हे महाराष्ट्राने कायम अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ही काय पध्दत आहे, यामुळे राज्याचे राजकारण बिघडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com