
मुंबई : लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीतही अनेक महाविद्यालये शुल्कवाढ करून शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र "विद्यार्थ्यांना वेठीस धराल तर गाठ आमच्याशी आहे" अशी तंबी देत मनविसेतर्फे महाविद्यालयांना पत्ताद्वारे विद्यार्थ्यांवर शुल्कभरण्यासाठी दबाव न आणण्याची विनंती करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांनी शुल्कवाढ करू नये, असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले असूनही अनेक महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांना मेसेज/मेल/फोनद्वारे शुल्कभरण्यासाठी तकादा करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी चेतना महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालय, एन. एम. महाविद्यालयासह मुंबईतील शुल्कवाढ करणाऱ्या महाविद्यालयांना पत्र पाठवून शुल्क वाढ करू नये, तसेच शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव न आणण्याची विनंती केली आहे.
कुलगुरू, युजीसीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
याबाबत कुलगुरूंनी सर्व महाविद्यालयांना पत्रक पाठवूनही महाविद्यालये त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनविसेनेने केला आहे. युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची सक्ती न करण्यास सांगितले आहे, शिवाय विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांच्या शुल्काबाबत निर्णय घेण्यास बजावले असून देखील महाविद्यालये त्याकडे कानाडोळा करत आहेत.
महाविद्यालयांना पत्र लिहून दादागिरी थांबवण्याची मागणी केली आहे. तरी देखील महाविद्यालय प्रशासनाने शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास अशा महाविद्यालयांना चांगलाच धडा शिकवण्यात येईल.
- अखिल चित्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.