Bharat Bandh | मुंबई - नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी पूलावर प्रचंड वाहतूक कोंडी

Bharat Bandh | मुंबई - नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी पूलावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई - देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा वाशी पूलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारतबंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने शिख बांधव आणि शेतकरी आझाद मैदानाकडे निघाले होते. त्यामुळे मुंबईच्या वेशीवरच म्हणजेच चेंबूरमध्ये या आंदोलकांना अडवण्यात आले आहे. त्यामुळेच दुपारी 2 वाजेपर्यंत वाशीपूलावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.  याच पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com