Bhivandi: भिवंडीतील सोनाळे गावात राहणारे एक उत्तर भारतीय कुटुंब आपल्या विवाहित मुलीला सासरी पाठवण्याच्या तयारीत असतानाच मुलीने घरातील सर्व दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून मुलीविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील माणिकपूर येथील राजनाथ जैस्वाल (४५) हे आपली चार मुले व पत्नीसह भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात राहत आहेत. जैस्वाल हे मुरली स्पॉट नावाच्या कपड्यांच्या कंपनीत काम करतात..
मागील वर्षी ११ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी मोठी मुलगी अंकिता (२४) हिचा विवाह मूळच्या आझमगढ जिल्ह्यातील परंतु सध्या वसई येथे राहणाऱ्या अंकित शिवबचन जैस्वाल याच्याशी हिंदू पद्धतीने केला होता.
उत्तर भारतीय रिवाजानुसार मुलीचे लग्न झाल्यानंतर वर्षभरातच तिला डिसेंबर महिन्यात सासरी पाठवण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी त्यांनी ३५ हजार रुपये किमतीचे दागिने व ४० हजार रुपये रोख रक्कम जमा करून घरात ठेवली होती; मात्र सासरी पाठवण्याची तारीख आणि दिवस निश्चित व्हायचा होता.
भरदुपारी दागिने चोरून गायब
राजनाथ जैस्वाल रात्रपाळीच्या कामावरून घरी आल्यानंतर गुरुवारी (ता. २३) दुपारी घरी संपूर्ण कुटुंबासह झोपेत होते. दरम्यान, त्यांची विवाहित मुलगी कपाटात ठेवलेले पैसे व दागिने घेऊन बेपत्ता झाली. बरीच शोधाशोध करूनही तिचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता.
शिवाय, मोबाईलही बंद येत असल्याने मुलगी मुद्देमाल चोरून प्रियकरासह पळून गेल्याच्या संशयावरून राजनाथ जैस्वाल यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांची दोन पथके तयार करून फरार तरुणीचा शोध सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणवीर बयेस यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.