कारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

कारल्‍याच्या भावात घसरण झाली  आहे.
कारल्‍याच्या भावात घसरण झाली आहे.

रोहा (बातमीदार) : कारल्याची निर्यात मंदावल्याने त्याच्या भावात प्रति किलोला १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कारले उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात कारल्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपये भाव मिळाला होता. यंदा त्याच्या भावात घसरण झाली असून १८ ते २० रुपये भाव आहे. आखाती देशांसह चीन, तैवान आदी देशात त्याची निर्यात होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

जिल्हाभरात सुमारे दीड हजार हजार एकरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. भाव कोसळल्याने या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे खजिनदार दगडू बामुगडे यांनी सांगितले. 

कारल्याच्या शेतांची चांगली मशागत आणि  पिकाची काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळते. प्रति एकर १ टन उत्पादन निघते. उन्हाळी हंगामात २५ ते २७ तोड घेतली जाते. म्हणजेच १ एकर जमिनीतून २५ ते २७ टन उत्पादन मिळते, असे गडबल येथील  शेतकरी परशुराम म्हात्रे 
यांनी सांगितले. 

कारल्याची निर्यात मुख्यत्वे आखाती देशात होते. ती थोडीफार मंदावली आहे. मात्र निश्‍चित कारण सांगता येत नाही.
- कैलास ताजने, भाजीपाला व्यापारी 

मागील वर्षीच्या तुलनेत कारल्याचे भाव फारच उतरले आहेत. शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका पडत आहे. 
- गणेश गावडे, शेतकरी, धोंडखार 

राज्यात कारल्याचे पीक चांगले आल्याने बाजारात आवक वाढली आहे. निर्यातसुद्धा मंदावली असल्याने या वर्षी भाव घसरले आहेत.
- शंकर पिंगळे, भाजीपाला व्यापारी, नवी मुंबई

दृष्टिक्षेप
कारल्याचे क्षेत्र : १५०० एकर
गेल्या वर्षीचा भाव : ३५ रुपये 
यंदाचा भाव : २० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com