Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Mumbai Water Cut: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयांत ८८.४० टक्के इतके पाणी जमा झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार आहे.
Mumbai Water Cut

Mumbai Water Cut

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहरासह पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. सध्या मुंबईतील सातही जलाशयांमध्ये एकूण १२,७९,५३४ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे मुंबईत सुरु असणारी १० टक्वे पाणी कपात कधी संपणार, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात असताना यावर बीएमसीने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com