
मुंबई : बीएमसीने मुंबईतील आणि ठाणे शहरातील काही भागात पाणीकपात जारी केली आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून यासाठी २१ ऑगस्ट रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.