कोरोनाची धास्तीमुळे  मुंबई, पुण्यातील मुलगा नको गं बाई ! 

कोरोनाची धास्तीमुळे  मुंबई, पुण्यातील मुलगा नको गं बाई ! 

डोंबिवली : आयुष्याचा जोडीदार हा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातला असावा, असे अनेक मुलींना वाटते. मात्र, सध्यस्थितीत मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याबाबतची पसंती बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील मुली मुंबई, पुण्यात राहणारा मुलगा लग्नासाठी नको! असा निश्‍चय करू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात या शहरातील मुलांना लग्नासाठी मुलगी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून, यात महाराष्ट्रासह मुंबईत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील मुलगा नको! अशी भूमिका ग्रामीण भागातील मुलींचे आई-वडील घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता धकाधकीचे जीवन असणाऱ्या या शहरांमध्ये मुलगी का द्यायची? असा सवाल या पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सोयरीक जमवण्यासाठी असे पालक शहरातील मुलांना नकार देत आहे.

ग्रामीण भागातील अनेक मुलींची एरवी मुंबई सारख्या शहरातील मुलांना पसंती असायची. मात्र, आता या मुली देखील आपल्या पालकांच्या मताशी सहमती दर्शवत शहरातील मुलांना नकार देत आहे. त्यामुळे या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांवर संक्रांत ओढवली आहे. ग्रामीण भागातील मुलींशी लग्न जमवण्याबाबत पालकांची बोलणी सुरू होती. मात्र, कोरोनाचा धास्तीने ही बोलणी फिस्कटल्याचे मुंबई उपनगरीय परिसरात राहणाऱ्या एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवरून सांगितले. लग्नाबाबत समाज माध्यमांवरही विविध मनोरंजनात्मक माहिती तरुणाईकडून प्रसारित केली जात आहे. 

शेतकरी मुलांना प्राधान्य 

पुण्यातील दौंड नजीक असलेल्या पाटस येथील पूजा शितोळे हिची लग्नासाठी बोलणी सुरू होती. मात्र, कोरोनामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरातील कुटूंबांची अवस्था बातम्यांमधून पाहात आहे. त्यामुळे दोन घास कमी, मात्र गावाकडील सुखी ठेवणाऱ्या मुलासोबतच लग्नगाठ बांधेल, असे पूजा म्हणाली. तर रत्नागिरी येथील प्रियांका चव्हाण हिने सांगितले की, कोरोनामुळे अनेक गोष्टींची जाणीव होत आहे. शहरात उंच इमारतीत राहणाऱ्या मुलांपेक्षा गावकडच्या मातीत राबणारा शेतकरी मुलगा चालेल. असा काहीसा मतप्रवाह कोकणातील पालकांमधूनही व्यक्त होत आहे. 

शहरातील मुलगा नको असे मत काही लोकांचे असू शकते. मात्र, परिस्थिती बदलली की मतपरिवर्तन होईल. कारण शहरातील कोरोनाच्या धास्तीने तूर्तास गावाकडील मंडळी असे बोलत असतील. भविष्यात पुन्हा मुलींच्या पालकांकडून शहरातील मुलांना प्राधान्य दिले जाईल. कोरोना प्रादुर्भाव होण्याअगोदर गाव आणि शहरामध्ये अनेक लग्नगाठी जुळल्या आहेत. -शिवाजी नरवडे, संचालक, वधू वर सुचक मंडळ.

brides from western maharashtra and konkan are refusing marriage proposal of grooms of mumbai and pune

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com