अंबा नदीतील रसायनांमुळे हजारोंचा जीव धोक्यात

पाली : अंबा नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे.
पाली : अंबा नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे.

पाली : येथून वाहणाऱ्या अंबा नदीत शेवाळ आणि रसायन पसरले आहे. त्यामुळे पाण्याला हिरवा आणि लाल तवंग आहे. पाली शहरासह तालुक्‍यातील हजारो नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने आरोग्याशी खेळ सुरू आहे.

पावसाळ्यानंतर अंबा नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवण्यात येते. त्यामुळे शेवाळ साचून पाण्याला हिरवा रंग आला आहे. काही गावातील नागरिकांनी टाकलेला कचरा, निर्माल्य कुजल्यानेही पाणी खराब झाले आहे. त्यामुळे पाण्याला उग्र दर्प येतो. चवही बदलली आहे, असे नागरिक सांगतात.

सुधागड तालुक्‍यात पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कानसळ, हेदवली, जांभूळपाडा या गावांजवळच अंबा नदीच्या काठावर अनेक रासायिक कारखाने आहेत. त्यामधील काही कारखान्यांकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. यामुळे तालुक्‍यातील अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्‍यात आले आहे, अशी माहितीही नागरिकांनी दिली. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी संजय आवटी यांच्याशी संपर्क  झाला  नाही.

पालीची योजना रखडली
* अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीला अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो; परंतु त्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही सोय नाही. या गावाची शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. 
* राज्य सरकारने केलेल्या २००८ - ०९ च्या सर्व्हेनुसार नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. ७ कोटी ७९ लाखांचा निधी आणि १० टक्के लोकवर्गणीद्वारे नळयोजना उभी राहणार होती; परंतु राजकीय श्रेयवादामध्ये ती रखडली. त्याबरोबर लोकवर्गणीचा प्रश्नही होता. 
* पालीला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळ-पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे; पण ती कार्यान्वित झाली नाही.

वन्यप्राण्याचे जीवन अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या नदीचे पाणी दूषित करणाऱ्या कंपन्यांवर 
कारवाई करण्यात येईल.  
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, सुधागड-पाली

पालीसाठी अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु रासायनिक कंपन्यांमुळे नदीचे पाणी दूषित होत असेल, तर संबंधित कंपन्यावर ग्रामपंचायतीकडून कारवाई केली जाईल. 
- गणेश बालके, सरपंच, ग्रामपंचायत पाली

अंबा नदी सुधागड तालुक्‍याची जीवनदायिनी आहे. त्यामुळे या नदीचे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.  
- किरण खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com