

Maharashtra UCC
ESakal
राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत एक महत्त्वाची घोषणा केली आणि राज्यात समान नागरी संहितेचे नियम व आराखडा तयार करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेची घोषणा केली. या सात सदस्यीय तज्ज्ञ समितीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.