DCM Eknath Shinde : भविष्यात भटके-विमुक्त नाही तर, स्थिर आणि चिंतामुक्त समाज ही ओळख निर्माण झाली पाहिजे

भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च पातळीवर मांडण्यासाठी प्रयत्न करण्याची संजय राठोड यांची ग्वाही.
DCM Eknath Shinde

DCM Eknath Shinde

sakal

Updated on

​मुंबई - भटके-विमुक्त समाजाला वर्षानुवर्षे दुर्लक्षित आणि उपेक्षित राहावे लागले. मात्र, आता भविष्यात 'भटके-विमुक्त' ही त्यांची ओळख पुसली जाऊन 'स्थिर आणि चिंतामुक्त समाज' हीच त्यांची खरी ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अखिल भारतीय शिव भटके-विमुक्त सेनेच्या वतीने मुंबई येथे आज सोमवारी आयोजित भटके - विमुक्त हक्क, न्याय आणि विकास परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन 'अखिल भारतीय शिव भटक्या-विमुक्त सेने'चे राष्ट्रीय नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com