

-नितीन बिनेकर
मुंबई : सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर १०० कंत्राटी फेरीवाल्यांची नियुक्ती केल्याची बातमी सकाळने प्रकाशित केल्यानंतर प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आता ही योजना कल्याण-कसारा मार्गावरही विस्तारण्याची तयारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.